Posts

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

Image
प्रतिनिधी तळणी रवी पाटील   "संतांचे उपकार आणि त्यांची अनुभूती असल्याशिवाय मनुष्याच्या मनात दान करण्याची प्रवृत्ती निर्माणच होत नाही. संतांच्या साधनेमुळे भूमी पवित्र होते. देवापेक्षा जास्त अधिकार साधू-संतांचाच असतो. म्हणूनच आपण संतांच्या चरणी शरण जातो," असे प्रभावी प्रतिपादन ह. भ. प. विशाल महाराज खोले यांनी येथे केले. श्रावण मासानिमित्त नळडोह येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही एक महिन्याच्या कालावधीत धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ तसेच अन्नदानाचे भव्य आयोजन पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडत आहे.  कीर्तनात बोलताना महाराज म्हणाले, "या परिसरावर श्री संत जनार्दन महाराज यांचे अमूल्य उपकार आहेत. त्यांच्या सातत्याने चाललेल्या साधनेमुळे ही भूमी पुनीत झाली आहे. दान करण्याची कृती ही मनुष्याच्या अंतरात्म्यात संतांची कृपा असल्यानंतरच प्रकट होते. एखाद्या वेळेस परमेश्वराकडे जाणारा प्रवाह थांबू शकतो, मात्र संतांच्या प्रेमाने तयार झालेला प्रवाह हा कधीच थांबत नाही." यावेळी त्यांनी जगद्गुरु तुकाराम...

निम्न दुधना जलाशयात कार्यक्षेत्राबाहेरील मच्छिमारांकडून अनाधिकृतपणे चोरुन मासेमारी

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    निम्न दुधना जलाशयात कार्यक्षेत्राबाहेरील मच्छिमारांकडून अनाधिकृतपणे चोरुन मासेमारी करत असल्याचे मापेगाव मच्छीमार सहकारी संस्था मर्या. मापेगाव या संस्थेच्या वतीने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जालना यांना सदर संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील मच्छीमार निम्नदुधना जलाशयात चोरुन व अनाधिकृतपणे कोळंबी, मासेमारी करत असल्याबाबतची तक्रार दिली होती.  त्याअनुषंगाने सहाय्यक मत्स्य आयुक्त जालना यांनी पोलीस अधीक्षक जालना यांना पत्र पाठव या प्रजनन काळात अनधिकृत मासेमारी करण्याऱ्यावर कारवाई करण्याचे म्हंटले आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, मापेगाव मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. मापेगाव या संस्थेकडे शासन निर्णय दि.०३.०७.२०१९ नुसार निम्नदुधना जलाशय मापेगाव मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. मापेगाव या संस्थेस तलाव ठेका आदेश जा. क्र. मत्स्य/भू ०११२०७/११२/३०१/२०२४, दि.३०.०७.२०२४ नुसार ०५ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी मत्स्यव्यवसायाकरीता ठेक्याने दिला आहे. संस्थेने शासन धोरणानुसार सन २०२५ - २६ या कालावधीचा तलाव ठेका रक्कम व मत्स्यब...

नियम डावलून घेण्यात आलेली निवडणूक पुन्हा घेण्याची सभासदांची मागणी,सहकार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या निवडणुकीत नियम डावलून निवडणूक घेण्याचा आरोप करत सभासदांनी सहकार आयुक्त यांना लेखी निवेदन सादर करत निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे  निवेदनात असे म्हटले आहे की, सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. परतूर ता. परतूर जि. जालना या संस्थेच्या निवडणुक प्रक्रियेचा वेळ,अंतिम मतदार यादी नावे समाविष्ट पत्र वाटप वेळ सकाळी १०.३० ते ११.००, प्राप्त नामनिर्देशन पत्र छाननी करणे स. ११.०० ते ११.१५., छाननी अंतिम पात्र उमेदवारांची नावे घोषित करणे सकाळी ११.१५ ते ११.३०., नामनिर्देशन पत्र माघारी घेणे सकाळी ११.३० ते १२.००, निवडणुक लढविणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी घोषित करणे दुपारी १२.०० ते १२.१५., मतदानाची वेळ दुपारी १२.१५ ते १.१५., मत मोजणीची वेळ दुपारी १.१५ ते संपेपर्यंत तरी या भ्रष्ट निवडणुक अधिकारी  आ.सां.गुसिंगे व बी. टी. लिंगायत यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करुन व निवडणुक नियमाचे उल्लंघन करुन दुपारी तीन वाजेच्या नंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात करुन एकतर्फी निवडणुक प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे...

तळणी मंडळात २४ तासात १४७ मि मि रेकार्ड ब्रेक पाऊस,तळणी परिसरात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  मंठा तालुक्यातील तळणी परिसरात ढगफुटी सारखा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले . खास करून नदी काठावरील शेतजमीनी अक्षरशः खरडून गेल्या वळणे फुटली तर अनेक शेतकर्याच्या विहीरीमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने गाळ जाऊन बसला तळणी परिसरात २००६ नतंर पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला . या वर्षात पावसाळा सुरू झाल्यापासून तळणी परिसरात पिकांना पुरेसा असा पाऊस पडत असल्याने यावर्षी पिकांची परिस्थिती छान होती वेळेवर झालेली पेरणी व पोषक वातावरण निर्माण झाल्याने यंदाचा हगाम हा शेतकर्यावर कृपा करेल असे वाटत असतानाचा मंगळवार च्या रात्री सलग सात तास पडलेल्या पावसाने शेतकर्याच्या स्वप्नावर विरजण पडले . या एकाच पावसात तळणी परिसरातील छोटे मोठे तलाव पूर्णपणे भरल्या गेले आहेत . तळणी पासून जवळच असलेल्या बेलोरा येथील दोन छोटे तलाव फुटल्याने बेलोरा व वझर सरकटे गावातील शेतीचे नुकसान झाले . विशेष बाब म्हणजे तळणी गावालगतच जाणार्या ओढ्याला कोकरबा शिवारापासून पाणी येऊन मिळते त्यामुळे पाण्याची मोठी आवक या ठ...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्याचे युनेस्को तर्फे जागतिक वारसा म्हणून निवड झाल्याबद्दल परतूर भाजपा तर्फे आनंदोत्सव साजरा

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्याचे युनेस्को तर्फे जागतिक वारसा(Heritage) म्हणून निवड झाल्याबद्दल परतूर भाजपा तर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  परतूरचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद व्यक्त करून अभिनंदन करण्यात आले. भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा मुख्य प्रदेश समन्वयक डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांनी प्रास्ताविक करतांना ही गोष्ट समस्त शिवप्रेमींसाठी अभिमान व गौरवाची गोष्ट असे सांगून बारा किल्ल्यांच्या स्थापत्य कलेवर प्रकाश टाकत सरकारच्या विविध स्तरावरील प्रयत्नांची व 12 किल्ल्यांची सविस्तर माहिती दिली ह्या माध्यमातून पर्यटन वाढीला लागेल आणि हिंदवी स्वराज्य महती जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल सर्वांच्या वतीने हर्षोल्लास व्यक्त केला... भाजप तालुका संघटन सरचिटणीस सावता काळे यांनी पुढे बोलतांना अखंड हिंदुस्तान आराध्य द...

दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तभ बनवा-विकासकुमार बागडी

Image
जालना प्रतिनीधी  समाधान खरात   जालना शहरात दिवंगत पत्रकारांच्या नावे एकही स्तंभ नसून या पत्रकारांचे मोलाचे योगदान राहिलेले असून त्यासाठीच त्यांच्या ही नावे शहरात एखादा तरी स्तंभ असावा आणि तो जालना शहर महापालिकेकडे व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे. यासंदर्भात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यात सामाजिक आणि राष्ट्रीय काम करणारे सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक, उद्योजक, माजी सैनिक आदींच्या नावाने शहरात अनेक रस्ते, चौक, कमान बांधण्यात आलेले आहेत. पण या सर्वांची कामाची प्रसिध्दी करणारे चौथा स्तभ म्हणजेच पत्रकारितेच्या नावे कुठेही आणि कोणत्याही चौकात किंवा रस्त्यावर एकही स्तभ नाही. जालना शहराच्या मध्यभागी म्हणजेच टाऊन हॉल येथे पत्रकारांसाठी स्वतंत्र स्तंभ उभारण्यात यावा, जिल्ह्यात दिवंगत झालेल्या पत्रकारांच्या नावे असा पत्रकार स्तंभ असेल तर तो चांगलाच आहे. शशिकांत पटवारी, उदय पटवारी, लक्ष्मण पायगव्हाणे, गणेश जळगांवकर, सतीष सुदामे, दिगंबर शिंदे, रमण गायकवाड, मनोहर बुजाडे, श्रीकृष्ण भारुका, शेख अलीम,...

धर्माच्या रक्षणासाठी जातीभेद विसरून एकत्र येण्याची गरज,मराठवाड्यातून विदर्भापर्यंत धर्म संस्कृती व राष्ट्रचैतनेचा ऐतिहासिक व पवित्र संकल्प

Image
तळणी प्रतिनिधी  रवी पाटील   सद्यस्थितीत आपला सनातन हिंदू धर्म हा अनेक संकटांना सामोरे जात आहे यामध्ये धर्मांतर हा विषय प्रामुख्याने आहे लव्ह जीहाद यासारख्या घटना आपल्याला आव्हान देत आहेत पश्चिम बंगालमधील हिंदू वर होत असलेल्या अत्याचारा असो की जळत असलेले मणिपूर याला कारण फक्त विखुरलेला आहे मी समाज आपण बहुसंख्यांक असून सुद्धा आपल्यावरच याचे आघात होत आहेत भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्याला एक संघ राहावे लागेल जातीभेदाच्या भिंती तोडून आपण सर्व हिंदू आहोत प्रत्येक हिंदू हा माझा बंद आहे हा भाव जोपर्यंत आपल्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाहीतआपली एकीचीवज्रमूठ समोरच्याला जागेवर बसू शकतेअखंड भारताचा इतिहास आपण जर बघितला तर आपण अधिक प्रमाणात गमावून बसलेला भाग आहे इराण आपले होते आपण बांगलादेश गमावून बसलो आपण पाकिस्तान गमावून बसलो नेपाळची पण फारशी परिस्थिती चांगली नाही जगाच्या पाठीवर एकमेव असलेले हिंदू राष्ट्र टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती तोडून आपल्याला एक संघ राहाव लागेल असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथावाचक विवेक दास शास्त्री महाराज यांनी आज तळणी येथे केले   ...