Posts

निस्वार्थ केलेला परमार्थ हाच उच्च कोटीचा आनंद देतो– विलास महाराज गेजगे

Image
तळणी प्रतिनिधी  रवी पाटील  परमार्थ करत असताना आनंद होत असेल तर आपण परमार्थ करत आहोत ही भावना निर्माण आपोआप होते काही जण म्हणतील परमार्थात आनंद कसा तर प्रत्येक मनुष्य परमार्थ करत नाही प्रत्येक मनुष्य माळकरी नाही प्रत्येक मनुष्य गंध टिळा बुक्का लावत नाही .माळ घालण्यासाठी परमार्थ करण्यासाठी प्रवृत्त होण्यासाठी या जन्मात मनुष्याला अनंत जन्माची पुण्याई निश्चित लागते तर त्या मनुष्याकडून निस्वार्थ परमार्थ घडू शकतो व तो परमार्थ करत असताना त्या मनुष्याला उच्च कोटीचा आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन विलास महाराज गेजगे यांनी तळणी येथे केले यंदाचे या सप्ताहाचे हे विसावे वर्ष असून श्री संत सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्याकडून या भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आता भय नाही असे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची या अभंगावर महाराजांनी निरूपण केले परमार्थ हा प्रत्येकाला न घडण्याचे कारण म्हणजे त्याच्या मुळात तील पाप वृत्तीचा दोष परमार्थिक वृत्ती साठी पूर्वीचे संचितही खूप महत्त्वाचे आहे त्याशिवाय या कलियुगात म...

अभेदाची भक्तीच देवाला प्रिय; भेद त्यागून परमार्थ करा – दशरथ अंभोरे महाराजांचा

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  परमार्थ करायचा असेल तर तो अभेदाच्या भावनेतूनच झाला पाहिजे. भेद धारण करून केलेली भक्ती देवाला प्रिय ठरत नाही. *अभेदाची भक्ती करावी, तीच भक्ती देवाला प्रिय आहे*, असा रोखठोक व विचारप्रवर्तक उपदेश दशरथ महाराज अभोरे यांनी तळणी येथे केला. हरीच्या भक्त नाही भय चिंता या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केले परमार्थिक साधना करत असताना अनेक अडचणी येत असतात परंतु मनाभावातून केलेली साधना ही त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचते फक्त त्या साधनेमध्ये अहंकार गर्व नसला पाहिजे आदर व ही नम्रपने केलेली साधनांचा स्वीकार देऊ नक्की करत असतो  श्री संत सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी कीर्तनसेवेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आधार घेत परमार्थाचा खरा अर्थ उलगडून सांगितला. महाराज म्हणाले की, आज अनेक जण परमार्थ करत असतानाही अंतःकरणात भेद बाळगतात. संसारामध्ये अभेद पाहिला जातो आणि परमार्थामध्ये भेद केला जातो, ही मोठी चूक आहे. *खरं तर संसारात भेद हवा आणि परमार्थात अभेद...

ज्ञानोबा तुकोबा शिवबा शिवाय या महाराष्ट्राचा इतिहास कधीच पूर्ण होणार नाही. शिव व्याख्याते अविनाश पाटील

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  आपल्या महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्या संत परंपरेच्या त्यागानेच त्यांच्या कष्टाने त्यांच्या समर्पण भावानेच आपण आज वाटचाल करत आहोत या वाटचालीमध्ये अनेक वीर पुरुषांचाही मोठा सहभाग त्यांचे बलिदान असल्यामुळेच आपण आज सप्ताह साजरे करतो आहे .या महाराष्ट्रात माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय या महाराष्ट्राचा इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही असे प्रतिपादन शिवव्याख्याते अविनाश महाराज पाटील यांनी तळणी येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात केले जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसूनी देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे या अभंगावर निरूपण केले जगद्गुरु तुकाराम महाराज यांना गाथा निर्माण करताना अनेक संकटांना सामोरे जावं लागलं त्यासाठी अपार कष्ट तुकोबांना झेलावे लागले परंतु तो गाथा आपल्याला सहज मिळाला आहे त्याचा उपयोग आपण केला पाहिजे देहू परिसरातील डोंगरावर तुकोबांनी ज्ञानसाधना करून त्याच साधनेच्या जोरावर वैकुंठा गमन केले मनुष्याच्या जीवनात निस्वार्थ ...

परमार्थात कष्ट करा; परमात्म्याचा पैसा घेऊ नका – ह.भ.प. राजेंद्र महाराज चोरडीया ,तळणी येथे तीन दिवसीय कीर्तन सोहळ्यात काल्याच्या कीर्तनातून परखड उपदेश

Image
तळणी प्रतिनीधी रवि पाटील   परमार्थ क्षेत्रात काम करा, कष्ट करा, धंदा–व्यवसाय, दुकानदारी करा; पण पोटासाठी श्रम करताना परमात्म्याचा पैसा घेऊ नका, असा परखड आणि अंतर्मुख करणारा उपदेश ह.भ.प. राजेंद्र महाराज चोरडीया यांनी दिला. तळणी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरात आयोजित तीन दिवसीय कीर्तन सोहळ्याच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी त्यांनी आजच्या वारकरी संप्रदायातील प्रवृत्तीवर चिंतन मांडले. आज वारकरी, टाळकरी ते कीर्तनकारांपर्यंत परमार्थाच्या नावाखाली परमात्म्याचा पैसा घेतला जातो; हे कोणाच्या ध्यानात आहे का, कोणी यावर बोलत आहे का? असा प्रश्न उपस्थित करत, निष्काम कर्म केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही, असे महाराजांनी स्पष्ट केले. निष्काम भावाने सेवा केली, तरच मन शुद्ध होते आणि जीवन मुक्तीकडे वाटचाल होते, असे त्यांनी सांगितले. सावध सेवा आणि अपेक्षाहीन भक्तीच प्रगतीचा मार्ग जीवाचे कर्तव्य आहे की सावध राहून परमार्थ करावा, सावध राहून देवाची सेवा करावी आणि अपेक्षाहीन भावाने सेवा करावी. जोपर्यंत अपेक्षाहीन सेवा केली जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रगती होत नाही, असे ...

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संघटकपदी विकासकुमार बागडी

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघच्या महाराष्ट्र संघटकपदी जालना येथील जालना समाचारचे संपादक  विकासकुमार बागडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटक  कैलास देशमुख यांनी एका नियुक्तीपत्रकाव्दारे केली आहे. विकासकुमार बागडी हे मागील 28 वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात  आहे. ते   पत्रकारांचे विविध प्रश्‍न व हितासाठी  काम करीत असून, त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना महाराष्ट्र संघटकपदाची जवाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात पत्रकारांची एकजुट करण्यासह त्यांच्या हितासाठी  काम करणार असल्याची ग्वाही नुतन महाराष्ट्र संघटक विकासकुमार बागडी यांनी दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफखान पठाण, केंद्रीय नियोजन समिती अध्यक्ष सुरेश सवळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, राष्ट्रीय महासचिव अशोक पवार, महाराष्ट्र...

लोणीकर पिता-पुत्रांचे कट्टर समर्थक नामदेव गोरे नगर परिषदेची निवडणुक लढविण्यास इच्छुक,आ.बबनराव लोणीकरांनी संधी दिल्यास सामाजिक कार्याच्या जिवावर नामदेव गोरे खेचुन आणु शकतात विजयश्री

Image
परतुर प्रतीनिधी संतोष शर्मा  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावपातळीवर राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार तयारीच्या मुडमध्ये दिसत आहेत. अशात युवक नेते तथा आ. बबनराव लोणीकर व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांचे कट्टर समर्थक नामदेव गोरे यांनी परतुर नगर परिषद प्रभाग सहा मधुन निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.    नामदेव गोरे हे गेल्या अनेक वर्षापासुन राजकारणात सक्रिय युवक नेते असुन नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम अग्रेसर राहुन समस्यांचे निराकारण करणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्षे नागरीकांसाठी निष्ठेने काम केले असून, दिलेला वेळ दाखविलेली निष्ठा आणि जनसंपर्क याच त्यांच्या उमेदवारीच्या प्रमुख ताकदी ठरतील, असा या प्रभागातील स्थानिकांचा विश्वास आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा कल आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पक्षाने व आ. बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांनी त्यांना संधी दिल्यास ते सामाजिक कार्याच्या जिवावर विजयश्री...

शिक्षकाचे स्थान हे देव्हार्यातील देवासारखे असले पाहिजे,निवृत्त शिक्षक अशोक कदम यांच्या निरोप समांरभ कार्यक्रमात डॉ पुरुषोतम भापकर यांचे प्रतिपादन

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील   ऊस्वद देवठाणा येथील निवृत्त शिक्षक अशोक कदम यांचा आज उस्वद येथील व्यकेश्वर मंदिरात सेवागौरव समारंभा आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण आयुक्त पुरुषोतम भापकर बोलत होते .शिक्षकाने शिस्त क्षमता आणि कर्तव्यदक्षता या तीन गोष्टींनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे शिक्षक हा समाज व्यवस्थेतील एक प्रमुख कणा असून त्याच्यावर येणाऱ्या पिढीवर संस्कार करण्याचे काम शिक्षकांचे आहे शिक्षकाने समाजात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे ही काळाची गरज आहे आपल्या मुलावर संस्कार त्यांची बौद्धिक क्षमता शैक्षणिक क्षेत्रात असणारे त्यांचे योगदान यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्नशील असणे खूप गरजेचे आहे सध्याच्या या धकाधकीच्या युगात आपण आपल्या शरीर संपदेकडे दुर्लक्ष करत असल्यानेअनेक व्याधींनीग्रस्त होत आहे आपल्या पाल्यांना व्यायामाची सवय लावणे सध्या गरजेचे आहे महाराष्ट्रात शिक्षण आयुक्त म्हणून काम करत असताना अडीच कोटी मुलं सात लाखाहून शिक्षक व एक लाखभर शाळा यांचे नेतृत्व करण्याची संधी मला शिक्षण आयुक्त असताना मिळाली त्या संधीचे सोने करत शिक्षण क्षेत्रात महार...