पुण्य परोपकार, पाप ते परपीडा” संतविचारांचा जागर, कीर्तनातून समाजमनाला स्पर्शसंतविचारांचा दीप पुन्हा प्रज्वलित संदीप महाराज खंडागळे यांचा कानडी येथे हितोपदेश
तळणी प्रतिनिधी रवी पाटील *“पुण्य परोपकार, पाप ते परपीडा”* या अमर अभंगातून मानवतेचा सोपा पण अत्यंत प्रभावी जीवनमंत्र देणारे संत तुकाराम महाराज यांचे विचार आजही समाजमनाला तितक्याच ताकदीने जागृत करतात. स्थानिक कीर्तन सोहळ्यात या अभंगावर करण्यात आलेल्या ओजस्वी निरूपणाने उपस्थित भाविक अक्षरशः भारावून गेले. कीर्तनकार **संदीप महाराज खंडागळे** यांनी संतवाणीचा गाभा उलगडताना स्पष्ट शब्दांत सांगितले – **“परोपकारासारखे पुण्य नाही आणि परपीडेसारखे पाप नाही.”** देवपूजा, वारी, भजन यांपुरते धर्माचे आचरण मर्यादित नसून, दुसऱ्याच्या अडचणीत धावून जाणे, संकटात मदतीचा हात देणे, सत्तेचा सदुपयोग करणे आणि प्रामाणिकपणे जगणे — हाच खरा धर्म असल्याचा ठाम संदेश त्यांनी दिला. अभंगातून जीवनाचा आरसा पुण्य परोपकार पाप ते परपीडा । आणिक नाही जोडा दुजा यासी ॥ *सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म । आणिक हे वर्म नाही दुजे ॥ या ओळींचे प्रभावी निरूपण करताना त्यांनी सांगितले की, दुसऱ्याच्या कल्याणाची भावना ज्या मनात असते, तेथेच खरे पुण्य साठते. एखाद्याचे वाईट व्हावे, त्याचे नुकसान व्हावे अशी इच्छा ठेवणे —...