Posts

दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची नियुक्ती

Image
जालना | प्रतिनिधी समाधान खरात  दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय दिगंबरराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. नियुक्तीपत्रानुसार, विजय जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दलित, वंचित, पीडित व अन्यायग्रस्त समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या विचारांनुसार कार्य करावे, अशी अपेक्षा संस्थापक-अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. दलित महासंघ ही महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक संघटना असून, समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे. यावेळी विजय जाधव यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी शुभेच्छा देत त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.

धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...

न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूरकरांसाठी सुवर्णसंधी : कोठाळकर हॉस्पिटलतर्फे २१ जून रोजी भव्य मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळाव्यात या उद्देशाने, येथील प्रसिद्ध 'कोठाळकर हॉस्पिटल क्रिटीकेअर व दातांचा दवाखाना' (आय.सी.यू. / ट्रॉमा व इमर्जन्सी सेंटर) च्या वतीने भव्य 'मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि २१ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोठाळकर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जालना आणि परतूर येथील विविध रोगांवरील तज्ज्ञ व नामांकित डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विष्णू एच. भुते, आर. व्ही. मेडीकेअर, जालना), मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. प्रल्हाद धारूरकर, न्यूरे सर्जरी, परिनिका न्युरोकेअर, जालना), अस्थिरोग व फ्रॅक्चर तज्ज्ञ डॉ. अरविंद म्हस्के, विघ्नहर्ता हॉस्पिटल, जालना), किडनी विकार तज्ज्ञ डॉ. संदीप प. देशमुख, आशुतोष हॉस्पिटल, जालना), डॉ. सतिश चव्हाण, चव्हाण हॉस्पिटल, परतूर), डॉ. अर्जु...

परतूर लायन्स क्लबचा ११ वा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न! अध्यक्षपदी महेश होलानी, सचिवपदी कैलास तांगडे तर कोषाध्यक्षपदी नरपत जांगीड यांची निवड

Image
 परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  येथील मुंदडा फंक्शन हॉलमध्ये परतूर लायन्स क्लबचा ११ वा दिमाखदार पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात क्लबच्या आगामी वर्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे महेश होलानी यांच्याकडे, सचिवपदाची सूत्रे कैलास तांगडे आणि कोषाध्यक्षपदाची सूत्रे नरपत जांगीड यांच्याकडे अधिकृतपणे सोपविण्यात आली. या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून सेकंड सेंचुरी ॲम्बेसिडर व माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन दिलीप मोदी उपस्थित होते. तर नवीन सदस्यांना शपथ देण्यासाठी इंडक्शन ऑफिसर म्हणून रिजन चेअरपर्सन लायन जयश्री लड्डा यांनी भूमिका बजावली.  नूतन कार्यकारिणी व पदाधिकारी: या सोहळ्यात केवळ मुख्य त्रिमूर्तीच नव्हे, तर क्लबच्या इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेतली: उपाध्यक्ष: राहुल सातोंनकर टेमर: संतोष शिंदे टेलर ट्विस्टर: तुकाराम उबाळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स: डॉ. सकलेचा, डॉ. नंद, डॉ. कदम, बबनराव उन्मुखे आणि डॉ. संदीप चव्हाण.  'हे' आहेत आगामी वर्षातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प: पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष महेश होलानी यांनी आपल्य...