स्वसंस्कृतीची ओळख आणि संघटनाच परिवर्तनाचा मार्ग डाँ प्रमोद आकात यांचे दुधा येथेप्रतिपादन, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाला आत्मभानाची गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून एकतेचा संदेश, दूध येथे विराट हिंदू संमेलन संपन्न
तळणी प्रतिनिधी रवी पाटील तळणी येथून जवळच असलेल्या दूधा येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात डॉक्टर प्रमोद आ कात यांनी मार्गदर्शन केले हिंदू समाजाने आपल्या मूळ संस्कृतीची आणि ओळखीची जाणीव ठेवणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादित केले संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजाने आत्मपरीक्षण करून संघटनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले कोणत्याही समाजाचे संघटन करण्यासाठी त्या समाजाला स्वतःची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे मी कोण आहे माझी संस्कृती काय माझा इतिहास कोणता आहे याची जाणीव झाल्याशिवाय खरी संघटन होऊ शकत नाही समाज परिवर्तन हे एकट्याची काम नसून संपूर्ण समाजाच्या एकत्रित प्रयत्नातूनच ते शक्य होते असे यासाठी आपल्यात समन्वय असणे गरजेचे आहे इतिहासाचा संदर्भ देत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या जीवनातून संघटन आणि स्वराज्याची प्रेरणा घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जोडलेला प्रत्येक मावळा हा हिंदवी स्वराज्याचे भगवे तोरण डोलाने सतत फडकत राहावे यासाठी त्यांनी संघर्ष केला प्रभू श्रीराम आणि प्...