Posts

जालना जिल्ह्यासाठी 8 हजार 515 कोटींच्या वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन, पीक कर्ज, कृषी व एमएसएमई क्षेत्राला प्राधान्य,वार्षिक पत आराखड्यात बँकांची 101 टक्के उद्दिष्टपूर्ती

जालना प्रतिनिधी नरेश आणा श्रीपती   सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 8 हजार 515 कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखडा (Annual Credit Plan) जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री के. के. कनवारिया हे सह-अध्यक्ष म्हणून तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एलडीओ निशांत यादव, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपविभागीय प्रमुख जीवन पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर, श्री. कायंदे, उपनिबंधक पी.बी. वर्खेडे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक शैलेश चौधरी तसेच विविध बँका व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना बँक ऑफ महाराष्ट्रचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मंगेश केदार यांनी सांगितले की, मागील वर्षीचा पत आराखडा 7 हजार 770 कोटी रुपयांचा होता. त्याच्या तुलनेत यंदाच्या आराखड्यात सुमारे 10 टक्क्यांनी वाढ कर...

सोनलनगर येथे Z TV Kutumbh तर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनलनगर येथील श्री संत गजानन महाराज संस्थान या परिसरात दिनाक २१ मे २०२६ गुरुवार रोजी महिलांसाठी मनोरंजन, माहिती आणि उत्साहाचा संगम ठरलेल्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन Z TV Kutumbh तर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम जालना महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती यांनी प्रभाग नऊ मधील महिलांसाठी आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री अक्षय बोरुडे यांनी केले या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमामध्ये झी टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या लोकप्रिय मालिकांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. या मालिकांमधील भूमिका साकारत असलेल्या व्यक्तीवर प्रश्न विचारण्यात आले ज्या महिलांनी बरोबर उत्तर दिले त्यांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली त्या महिलांसोबत विविध स्पर्धा घेण्यात आली. मालिकांमधील सामाजिक संदेश, कौटुंबिक मूल्ये आणि मनोरंजनाचा भाग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिलांनीही मालिकांविषयी आपली मते व्यक्त करत संवाद साधला. महिलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ, ...

विवेकानंद सेवा केंद्राचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे , यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विवेकानंद सेवा केंद्र परतुर संचलित विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर, विवेकानंद पब्लिक स्कूल परतुर, विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा परतुर, विवेकानंद इंग्लिश स्कूल केंधळी मंठा, अशा 4 शाळेचे एकूण 42 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये,विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून केंद्राच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. या परीक्षेमध्ये एकूण 42विद्यार्थी पात्र ठरले असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक व संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव व शिक्षकांचे परिश्रम यामुळे हे यश मिळाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस.जी.बाहेकर साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक आदरणीय संदीप दादा बाहेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. शिंदे मॅडम, प्रिन्सिपल महाजन सर, दंदा...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्यू. कॉ., च्या दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्ती साठी पात्र.

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्यू. कॉ., इयत्ता आठवीच्या च्या दोन विद्यार्थीनी रुचिता अमर नवल आणि कार्तिकी मुक्तिराम धुमाळ 2026 यावर्षी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तम गुण संपादन करून शिष्यवृत्ती साठी पात्र ठरल्या आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थिनींना संस्था अध्यक्ष नारायण  सोळंके, संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश सोळंके, सचिव छाया बागल, प्रिन्सिपल गोविंद पाठक, वाईस प्रिन्सिपल पूजा मोरे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी विद्यार्थीनीना शुभेच्छा देउन कौतुकाची थाप दिली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तळणीतील हिंदू संमेलनात एकतेचा जागर— “हिंदू समाज एकत्र आला तरच संकटे नाहीशी होतील” ह भ प गजानन महाराज सपकाळ यांचे प्रतिपादन

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  आज आपल्या भारतमातेवर विविध प्रकारचे प्रहार होत असून ती पूर्णतः सुरक्षित नाही, असे स्पष्ट प्रतिपादन विदर्भ प्रांत धर्मजागरण सांस्कृतिकचे ह.भ.प. गजानन महाराज सपकाळ यांनी केले. २०१४ नंतर हिंदुत्वाचा उदय दिसून येत असला तरी हिंदू धर्मावरील संकटे पूर्णपणे संपलेली नसून ती केवळ पुढे ढकलली गेली आहेत, असे त्यांनी नमूद केले. ही संकटे पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असून, त्यासाठी हिंदू संमेलनाच्या माध्यमातून जनजागृती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. जगाच्या पाठीवर असलेल्या या हिंदू राष्ट्रावर अनेकांनी आघात केले, तरीही “अनेकतेत एकता” या तत्त्वामुळे भारत आजही ताठ मानेने उभा आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. सनातन वैदिक हिंदू धर्माची संस्कृती ही जगासाठी आदर्श असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिले आहे. या भगव्या परंपरेची पताका अखंड तेवत ठेवण्यासाठी जातीपातीच्या भिंती गाडून “आपण हिंदू आहोत” ही भावना...

मंठा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त भव्य हिंदू संमेलन; एकतेचा, स्वदेशीचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेशभव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले; प्रमुख वक्ते संजय राव तालखेडकर यांचे प्रभावी मार्गदर्शन

Image
मंठा प्रतिनिधी रवी पाटील   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मंठा शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने शहरात आकर्षक व उत्साहपूर्ण शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून एकात्मतेचे दर्शन घडवले. संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून संजय राव तालखेडकर यांनी मार्गदर्शन करताना हिंदू संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि सध्याच्या काळातील जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या. “हिंदू संस्कृती ही अनादिकालापासून टिकून राहिलेली असून सततच्या आक्रमणांनंतरही ती अधिक सक्षम झाली आहे. जगाला शांततेचा संदेश देण्याचा अधिकार हिंदू समाजालाच आहे,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात हिंदू समाजाने जाती-पातीच्या भिंती ओलांडून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे.” स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांनी केलेली भविष्यवाणी आज साकार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. परमेश्वरप्राप्तीचा अधिकार सर्वांना समान आहे, ही हिंदू धर्मा...

स्वसंस्कृतीची ओळख आणि संघटनाच परिवर्तनाचा मार्ग डाँ प्रमोद आकात यांचे दुधा येथेप्रतिपादन, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाला आत्मभानाची गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून एकतेचा संदेश, दूध येथे विराट हिंदू संमेलन संपन्न

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील   तळणी येथून जवळच असलेल्या दूधा येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात डॉक्टर प्रमोद आ कात यांनी मार्गदर्शन केले हिंदू समाजाने आपल्या मूळ संस्कृतीची आणि ओळखीची जाणीव ठेवणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादित केले संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजाने आत्मपरीक्षण करून संघटनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले कोणत्याही समाजाचे संघटन करण्यासाठी त्या समाजाला स्वतःची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे मी कोण आहे माझी संस्कृती काय माझा इतिहास कोणता आहे याची जाणीव झाल्याशिवाय खरी संघटन होऊ शकत नाही समाज परिवर्तन हे एकट्याची काम नसून संपूर्ण समाजाच्या एकत्रित प्रयत्नातूनच ते शक्य होते असे यासाठी आपल्यात समन्वय असणे गरजेचे आहे   इतिहासाचा संदर्भ देत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या जीवनातून संघटन आणि स्वराज्याची प्रेरणा घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जोडलेला प्रत्येक मावळा हा हिंदवी स्वराज्याचे भगवे तोरण डोलाने सतत फडकत राहावे यासाठी त्यांनी संघर्ष केला प्रभू श्रीराम आणि प्...