Posts

पुण्य परोपकार, पाप ते परपीडा” संतविचारांचा जागर, कीर्तनातून समाजमनाला स्पर्शसंतविचारांचा दीप पुन्हा प्रज्वलित संदीप महाराज खंडागळे यांचा कानडी येथे हितोपदेश

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  *“पुण्य परोपकार, पाप ते परपीडा”* या अमर अभंगातून मानवतेचा सोपा पण अत्यंत प्रभावी जीवनमंत्र देणारे संत तुकाराम महाराज यांचे विचार आजही समाजमनाला तितक्याच ताकदीने जागृत करतात. स्थानिक कीर्तन सोहळ्यात या अभंगावर करण्यात आलेल्या ओजस्वी निरूपणाने उपस्थित भाविक अक्षरशः भारावून गेले. कीर्तनकार **संदीप महाराज खंडागळे** यांनी संतवाणीचा गाभा उलगडताना स्पष्ट शब्दांत सांगितले – **“परोपकारासारखे पुण्य नाही आणि परपीडेसारखे पाप नाही.”** देवपूजा, वारी, भजन यांपुरते धर्माचे आचरण मर्यादित नसून, दुसऱ्याच्या अडचणीत धावून जाणे, संकटात मदतीचा हात देणे, सत्तेचा सदुपयोग करणे आणि प्रामाणिकपणे जगणे — हाच खरा धर्म असल्याचा ठाम संदेश त्यांनी दिला.  अभंगातून जीवनाचा आरसा   पुण्य परोपकार पाप ते परपीडा । आणिक नाही जोडा दुजा यासी ॥ *सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म । आणिक हे वर्म नाही दुजे ॥ या ओळींचे प्रभावी निरूपण करताना त्यांनी सांगितले की, दुसऱ्याच्या कल्याणाची भावना ज्या मनात असते, तेथेच खरे पुण्य साठते. एखाद्याचे वाईट व्हावे, त्याचे नुकसान व्हावे अशी इच्छा ठेवणे —...

तुकाराम बीजे निमित्त कानडी येथे ह.भ.प. अर्जुन महाराज बादाड यांची प्रभावी कीर्तन सेवा; संत तुकाराम महाराजांच्या चरित्रातून भक्ती, समर्पण आणि पुरुषार्थाचा संदेश

Image
 तळणी प्रतिनिधी रवी पाटील संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम बीजे निमित्त कानडी येथे भाविकांच्या उपस्थितीत ह.भ.प. अर्जुन महाराज बादाड यांची अत्यंत भावस्पर्शी व विचारप्रवर्तक कीर्तन सेवा संपन्न झाली. या कीर्तनातून संत तुकाराम महाराजांचे चरित्र, त्यांचे निस्वार्थ भक्तिमार्ग, तसेच समाजाला दिलेला अध्यात्मिक संदेश यांचे प्रभावी विवेचन करण्यात आले. कीर्तनाच्या प्रारंभी महाराजांनी संत परंपरेचा उल्लेख करत सांगितले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीला संतांच्या त्याग, समर्पण आणि भक्तीमुळे पावित्र्य लाभले आहे. संत ज्ञानेश्वरांनी अल्पवयातच ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ निर्माण केला, तर संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत अध्यात्माचा मार्ग पोहोचवला. देहू नगरीत भजन-कीर्तनाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी विठ्ठलभक्तीचा प्रचार सुरू केला. कोणतेही पत्रक, जाहिरात किंवा प्रसिद्धी न करता केवळ कीर्तन आणि अभंगांच्या सामर्थ्याने त्यांचा संदेश खेड्यापाड्यांत पोहोचू लागला. त्यांच्या वाणीतील साधेपणा, भक्तीतील प्रामाणिकपणा आणि समाजजागृत...

कानडीतील अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिरसाची उधळण,देव देश आणि धर्मासाठी जगणे काळाची गरज,पच्चावन्नाव्या वर्षीही परंपरा अखंड; ह.भ.प. तुकाराम महाराज पारधी यांची कीर्तनसेवा

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  तळणीपासून जवळ असलेल्या कानडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाचा महासागर उसळला. यंदा या सप्ताहाचे पच्चावन्नावे वर्ष असून श्री कानिफनाथ मंदिर परिसरात शिवमहापुराण गाथा, हरिभजन व सायंकाळी कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुसऱ्या दिवशी ह.भ.प. तुकाराम महाराज पारधी यांच्या ओजस्वी वाणीतील कीर्तनसेवा संपन्न झाली. “ जग झोडी, जग जोडी, नाव ठेविले लाडी” या संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर आधारित निरूपण करत त्यांनी उपस्थित भाविकांना भक्ती, सदाचार आणि नामस्मरणाचा गूढ अर्थ समजावून सांगितला. “घरी बसून करा नामस्मरण; गंगा तुमच्यापर्यंत येईल” कीर्तनादरम्यान महाराजांनी सांगितले की, “तुमच्या अंतःकरणातील पाप नष्ट व्हावे, द्वेषभाव नाहीसा व्हावा, यासाठी शरणागती आवश्यक आहे.” काही भाविकांनी “आमच्याकडे तीर्थयात्रेला जाण्यासाठी पैसा नाही, साथ नाही” अशी व्यथा मांडली असता त्यांनी अत्यंत सोप्या शब्दांत मार्ग दाखवला—  “ तीर्थावर जाता येत नसेल तर घरीच बसा; पण मुखाने ‘गंगा गंगा’ म्हणा. नामस्मरणानेच तीर्थाचे प...

विवेकानंद विद्यालयाचे NMMS परीक्षेत घवघवीत यश

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  राष्ट्रीय दृष्ट्या आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी NMMS परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये विवेकानंद विद्यालयाचे एकूण 71 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.       या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एस. जी. बाहेकर साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक  संदीप  बाहेकर, तसेच मुख्याध्यापिका  श्रीमती. शिंदे मॅडम सर्व शिक्षक वृंद तसेच पालकांच्या वतीने या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक मांटे यांचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

Image
बुलढाणा प्रतिनिधी राधेश्याम बंगाळे  कठीण परिस्थितीतून यश मिळवत यशाला गवसणी घालून महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोगाच्या मार्फत 4 थ्या क्रमांकाने तब्बल दोन वेळा वर्ग 1 पदी निवड झाली त्यामध्ये समाज कल्याण विभागामध्ये सहाय्यक आयुक्त तसेच इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामध्ये सहाय्यक संचालक या पदांवर निवड झालेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगावचे सुपुत्र दिपक सु.मांटे यांचा दिनांक 23 फेब्रुवारी रोजी लोकसेवा नशामुक्ती व्यसन केंद्रामध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला ' यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला गावच्या सर्वांगीण विकासासाठी समाज कल्याण विभागामध्ये विविध प्रकारच्या योजनांची चर्चा केली.    तसेच एक आदर्श गाव बनवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या गावामध्ये लोकसहभागातून तसेच शासनाच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून दरेगाव या गावांमध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले. आज रोजी तालुक्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून दरेगावचा नावलौकिक झालेला आहे. गावातील लोक जातीपातीचे राजकारण सोडून जेव्हा विकासासाठी एकत्र येते तेव्हा काय होऊ शकतं याचं दरेगाव...

महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निवडपत्राचे मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण!

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' चे जालना जिल्ह्यातील पुरस्कार्थीना आज मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करून निवडपत्र प्रदान करण्यात आले.   सर्वप्रथम दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पुजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे राज्यसमन्वयक भगवान जायभाये यांनी केले.बदनापूरचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय क्षीरसागर, घनसावंगी चे गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, समता शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण जोशी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जालना जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाळ यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र शिक्षक पॅनल आणि पुरस्कार्थी श्रीम. साधनाताई गिऱ्हे, विकास पोथरे, श्रीनिवास सुदेवाड, निलेश सोमवंशी, भाऊसाहेब खाडे, शामराव टेकाळे, रणधीर पाटील, भाऊसाहेब कोलते, सिद्धार्थ म्हस्के, श्रीम. स्नेहल पवार, श्रीम दीपाली जोंधळे, श्रीम फरहत तांबोळी, निर्वती भालेकर, मनोहर विरकर, आवेज पठाण या शिक्षकांचे अभिनंदन तसेच कौतुक केले.   ...

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2026 जाहीर अध्यक्षपदी अतुल हजारे पाटील सचिवपदी नामदेव गोरे

Image
परतूर प्रतिनिधी  संतोष शर्मा  शहरात सर्व पक्षीय छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्सव समिती बैठक घेण्यात आली या मध्ये सर्वानुमते समिती जाहीर करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी अतुल हजारे तर सचिवपदी नामदेव गोरे यांची निवड करण्यात आली. परतूर येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार 9.00 वाजता शिवजन्मोत्सव समिती निवड करण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समितीतिच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल सोनपावले, विशाल शिंदे,सहसचिव रफिक सतार कुरेशी,कार्याध्यक्ष , विकास मोरे, कोषाध्यक्ष आकाश काळे, प्रवीण प्रधान तर संघटक म्हणून गोपी ठाकूर,प्रवीण पेडगावकर यांची निवड करण्यात आली सल्लागार म्हणून सावता काळे, अर्जुन राठोड, संभाजी घनवट,अर्जुन जगताप, ऍड सुरेश काळे,नरेश कांबळे, सिद्धेश्वर लहाने, विजय यादव  ही बैठक विठ्ठल दादा बरकुले (राष्ट्रवादी जिल्हा संघटक) यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली या वेळी संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण,डा प्रदीप सातोणकर,रमेश भापकर, शत्रुघ्न कणसे,संपत टकले,इझरान कुरेशी, रज्जाक कुरेशी, सतीश...