पैठणच्या जायकवाडी धरणातील पाणी गंगापात्रात सोडल्याने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा आमदार लोणीकर यांच्या तहसीलदारांना सूचना
जालना प्रतिनिधी समाधान खरात
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात गोदावरी नदीकाठच्या गावात पैठण च्या जायकवाडी धरणातील पाणी गोदापात्रात सोडल्यामुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्याला आलेल्या पूरांमुळे नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले नदीकाठच्या गोळेगाव चांगतपुरी सावरगाव गंगासांगवी येथील शेतकऱ्यांच्या शेतात गोदावरी नदीचे पाणी शिरल्यामुळे तेथील सोयाबीन कापूस मूग उडीद तुर अशा अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी याची तात्काळ दखल घेत परतुर तहसीलदार यांच्याशी ध्वनीवरून संपर्क साधला व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत..!
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा याची काळजी घेण्यासंदर्भात देखील लोणीकरांनी सूचना केली यावेळी दूरध्वनीवरून तहसीलदार यांना बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की अतिवृष्टी किंवा सततच्या पावसाने ते 33 टक्के पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असेल तर त्या पिकांचे पंचनामे करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत त्यामुळे शासनाच्या आदेशाची वाट न पाहता ते 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेले आहे त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात असेही लोणीकरांनी यावेळी स्पष्ट केले...!